Breaking News
मुंबई ः राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम नगरविकास विभागाने गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रभाग रचना पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. ती नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पुढे जाऊ शकते.
नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 9 टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी मुंबई महापालिकेची अंतिम केलेली प्रभाग रचना ही 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाईल. अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना ही 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाईल. ड दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाईल. नगर परिषदा आणि नगरपंचायतींची अंतिम प्रभाग रचना ही राज्य निवडणूक आयुक्त 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान जाहीर करतील. याचा अर्थ अंतिम प्रभाग रचना ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल. त्यानंतर दोन महत्त्वाचे टप्पे असतील. आधी प्रभागांचे आरक्षण जाहीर केले जाईल आणि नंतर प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. हे दोन टप्पे पूर्ण व्हायला किमान एक ते दीड महिना लागतो, असा पूर्वानुभव आहे. हे लक्षात घेता ऑक्टोबरच्या शेवटी वा नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सर्व कार्यवाही पूर्ण होऊनच निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागेल. त्यामुळे महापालिका व नगरपालिकांची निवडणूक नोव्हेंबर वा डिसेंबरपर्यंत पुढे जाण्याची शक्यता आहे.
कार्यक्रमाचे टप्पे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai