विद्यार्थ्यासह पालकांनीही केले वृक्षारोपण
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2025
- 86
नवी मुंबई ः ‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ अभियान अंतर्गत स्वच्छताविषयक उपक्रम राबविण्यासोबतच पर्यावरणाचीही काळजी घेण्यात येत असून त्या अनुषंगाने दिघा येथील शाळा क्रमांक 108 व 79 येथील विद्यार्थ्यांमार्फत 140 देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाचा विशेष म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांसमवेत त्यांचे पालकही सहभागी झाले होते. यावेळी निंब, अर्जुन, आवळा, करंज, जांभूळ अशा देशी वृक्ष रोपांची लागवड दिघा विभागातील इलठणपाडा, विष्णूनगर, पंढरीनगर भागातील टेकडीवर करण्यात आली. यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन संस्थेच्या सदस्यांमार्फत 75 देशी वृक्षारोपण करण्यात आले.
दिघा पटनी रोड येथील ग्रीन वर्ल्ड इमारती समोरील मोकळ्या जागेत दिघा विभागातील अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिक यांच्या वतीने ताम्हण, जांभूळ, कडुनिंब या 25 देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. दिघा विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. नैनेश बदले व स्वच्छता अधिकारी श्री. प्रविण थोरात यांच्या माध्यमातून उद्यान विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. अशाचप्रकारे कोपरखैरणे विभागात शाळा क्रमांक 38 येथेही विद्यार्थ्यांच्या हस्ते मुख्याध्यापिका रत्नमाला पाटील यांच्या पुढाकारातून सहा.आयुक्त भरत धांडे व स्वच्छता अधिकारी राजु सिंग चव्हाण यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कचरा वगकरणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले तसेच योग्य प्रकारे कचरा ठेवणे व कुठेही कचरा न टाकणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबतही विद्याथ प्रबोधन करण्यात आले. तुर्भे विभागातच गामी इंडस्ट्रीज् जवळील झोपडपट्टी भागातही कचरा वेगवेगळा ठेवणे व प्लास्टिक बंदी याविषयी जनजागृती करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai