भारताच्या खाद्य संस्कृतीला जागतिक मान
- by मोना माळी-सणस
- Jan 03, 2026
- 116
सर्वोत्तम अन्न शहरांमध्ये मुंबई पाचव्या स्थानी तर सर्वोत्तम पाककलेमध्ये भारताचा 13 वा क्र.
मुंबई ः टेस्ट अटलास्ट ने विविध वैशिष्ट्यांचा गौरव करत भारतीय खाद्यसंस्कृतीला जागतिक स्तरावर मान्यता दिली आहे. जगभरातील सर्वोत्तम 100 खाद्य पदार्थ, खाण्यासाठी योग्य असलेली शहरे, पाककृतीसाठी उत्तम असणारे प्रदेश अशा विविध गटांची यादी टेस्ट अटलास्टतर्फे जाहीर केली जाते. सन 2025/26 या वर्षात 100 जाहीर केलेल्या सर्वोत्तम 100 अन्न शहरांमध्ये मुंबईने 5 वा क्रमांक पटकावला आहे. तर सर्वोत्तम 100 पाककृतीमध्ये भारताला 13 वे स्थान मिळाले आहे. तसेच सर्वात्तम खाद्यपदार्थ, मिष्टान्न, सर्वेात्तम अन्नप्रदेश या यादीमध्येही भारताने आपला ठसा उमटवला आहे. मुंबईच्या खाद्यपदार्थांची जागतिक पातळीवर दखल घेतल्याने ही अभिमानाची बाब असून यामुळे मुंबईसह भारताची खाद्यसंस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे.
टेस्ट अटलास्टतर्फे जगभरातील पारंपरिक पदार्थ, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि खाद्यशहरे यांची विविध वैशिष्ट आणि गुणधर्मांच्या आधारे वर्गीकरण करुन बेस्ट 100 ची यादी जाहीर केले जाते. सन 2025/26 या वर्षात जाहीर केलेल्या सर्वोत्तम पाककृतीमध्ये भारत13 व्या स्थानी, सर्वोत्तम खाद्यपदार्थ व सवात्कृष्ट मिष्टान्नमध्ये महाराष्ट्रीतील काही पदार्थांसह भारतातील विविध राज्यातील पदार्थांनी छाप पाडली आहे. सर्वोत्तम अन्नप्रदेशमध्ये ही भारतातील प्रदेशाची नोंद घेतली असून सर्वोत्तम खाद्य शहर म्हणून मुंबईचा 5 वा क्रमांक आला आहे. मुंबईतील भेळपुरी, पाव भाजी, वडापाव, मोदक, रगडा पॅटिस या पदार्थांची विशेष नोंद घेतली आहे. मुंबईतील पारंपरिक उपहारगृहामध्ये राम आश्रय, श्री ठाकरे भोजनालय, नवाब साहेब, कॅफे मद्रास, बाबा फालुदा या ठिकाणांचा समावेश आहे. मुंबईला पहिल्या पाचमध्ये स्थान देताना या पदार्थांचा व ठिकाणांचा विशेष उल्लेख केला आहे. एकुणच भारताने जागतिक स्पर्धेत स्थान मिळवल्याने भारतातील खाद्यसंस्कृती जगभरात पोहचल्याने ही अभिमानास्पद बाब आहे.
सर्वोत्तम अन्न शहरे असणारी 100 शहरे ही 18,912+ पदार्थांच्या रेटिंगवर आधारित आहे. भारतात अमृतसर, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई या शहरांनीही पहिल्या 100 मध्ये आपली हजरे लावली आहे. भारतीय पाककलेची विविधता व स्वाद जागतिक दर्जावर मानली गेली आहे. सर्वेात्तम पाककृतीमध्ये भारत 13 व्या स्थानी असून यामध्ये बटर गार्लिक नान, अमृतसरी कुलचा, गरम मसाला, परोठा आणि मुथीया या पदार्थांचा प्रामुख्याने समावेश आहे. जगातील सर्वोत्तम पदार्थाच्या यादीतही भारताचे काही पदार्थ झळकले आहेत. यामध्ये अमृतसरी कुल्चा, मर्ग मखनी/बटर चिकन, हैदराबादी बिर्याणी, शाही पनीर हे पदार्थ त्यांच्या चव, स्थानिक ओळखी आणि लोकप्रियतेमुळे जागतिक यादीत समाविष्ट झाले आहेत. मिष्टान्नासाठी 2274 पदार्थांना 97422 या रेटिंगच्या आधारी निवड केली आहे. यातील पहिल्या 100 मधील दोन पदार्थ हे भारतातील आहेत. यात राईस पुडिंग म्हणजेच फेरणी आणि कुल्फी या दोघांनी पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवले आहे. इटालियन, ग्रीक, मेक्सिकन, स्पॅनिश, पोर्तुगिझ या प्रसिद्ध पाककला पुढे असतानाही, भारताने 5,13 1 5 हे क्रमांक मिळवले आहेत. हे भारतीय खाद्य परंपरेची वैशिष्ट्ये व श्रेय सिद्ध करते.
भारताच्या रँकिंगवरून हे स्पष्ट होते की येथील पाककृतींनी जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेतले आहे. जगभरातील लोक प्रादेशिक पदार्थ, पारंपारिक मसाले आणि सर्वसामान्य असलेल्या आवडत्या पदार्थांपेक्षा वेगळे स्वयंपाक पद्धतींचा शोध घेत आहेत. अधिकाधिक भारतीय घटक आणि पाककृती मुख्य प्रवाहात येत असल्याने, देशाची खाद्यसंस्कृती मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. ही ओळख भारतीय घरगुती स्वयंपाक, रस्त्यावरील अन्न आणि प्रादेशिक वैशिष्ट्यांमुळे समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि सर्वांसाठी सुलभ असलेल्या पाककृतीमध्ये कसे योगदान मिळते हे देखील प्रतिबिंबित करते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस