हवामान कृती आरखड्यासाठी हरितप्रेमी एकवटणार
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 07, 2022
- 897
पर्यावरणीय असंतुलनासाठी सिडकोला धरले जबाबदार
नवी मुंबई : पर्यावरणाचा र्हास ताबडतोब थांबविण्याच्या गरजेवर हरीत समुहांनी भर दिला आहे. शहराच्या हवामान कृती आरखड्यावर काम करण्याची तयारी विकासकांनी दाखवली आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ‘बॅलन्सिंग डेव्हलपमेंट विथ एनव्हायर्नमेंट’ (पर्यावरणासह विकासाचे संतुलन) या विषयावर झालेल्या चर्चासत्रात दोन्ही बाजूंच्या भूमिका स्पष्ट केल्या. धोरण आराखडा तयार करण्यासोबत सिडको आणि एमएमआरडीए सारख्या सरकारी एजन्सींचा हवामान नियंत्रण विकास आरखड्यात सहभाग करून घेण्यासाठी हे चर्चासत्र महत्त्वाचे ठरले.
नाटकनेक्ट फाऊंडेशन, नवी मुंबई फर्स्ट आणि क्रेडाई एमसीएचआय युथ यांच्या वतीने नवी मुंबई मर्चंटस् जिमखाना येथे या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई हे एक नियोजित शहर असल्याचा पुनरुच्चार नाटकनेक्ट फाऊंडेशनच्या संचालकांनी केला. 50 वर्षांपूर्वी या दिशेने चांगली सुरुवात झाली होती मात्र आजच्या तारखेत या नियोजनकाराला मूळ उद्दिष्टाचा विसर पडलेला असून निसर्ग संवर्धन, प्रामुख्याने कांदळवने आणि पाणथळ जतनाकडे दुर्लक्ष होताना दिसते. पायाभूत प्रकल्पांसाठी पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदन क्षेत्रांचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कांदळवनांची कत्तल आणि पाणथळ बुजवल्याने उरण पट्ट्यात पूरस्थिती निर्माण होण्यासाठी जबाबदार असलेल्या सरकारी अधिकार्यांच्या विश्वासार्हतेवर कुमार यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. जेएनपीटी, एनएमएसईझेड आणि सिडको या सर्व प्रकल्प समर्थकांकडून पर्यावरणावर होणारे विनाशकारी परिणाम दुर्लक्षित होत आहेत, असा इशारा श्री एकविरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी दिला. खाडी आणि पाणथळ प्रदेशातून वाहणार्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात हस्तक्षेप केल्याने उरणमधील गावांत निर्माण होणार्या बिगरमोसमी पुराकडे त्यांनी लक्ष वेधले. कामाची सुरुवात केल्यानंतर बदललेल्या सीआरझेड नियमांचा परिणाम काही रियल इस्टेट प्रकल्पांवर झाला असून हे प्रकल्प आता भोगवटा प्रमाणपत्रांसाठी झगडत असल्याचे क्रेडाई एमसीएचआय-उरण द्रोणागिरीचे अध्यक्ष दीप राजपाल यांनी सगितले. नवी मुंबईच्या विकासाकरिता आपल्या जमिनी देणार्या प्रकल्प-बाधितांसाठी भरपाईपोटी देण्यात आलेल्या घरांच्या इमारती या प्लॉटवर उभारण्यात येत आहेत. पर्यावरणाच्या दिशेने सर्वच सहयोगीनी काम करण्याच्या गरजेकरिता हीच योग्य वेळ आहे यावर के्रडाई एमीसएमचआय यूथचे अध्यक्ष इस्त्रायल शेख यांनी जोर दिला.
विकासक समुदाय हा पर्यावरण-विरोधी असल्याची प्रतिमा दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कांदळवने आणि पाणथळीचे संवर्धन करण्यासाठी पर्यावरण गटांसोबत काम करण्यासाठी आम्ही तयार आहोत. - नवी मुंबई फर्स्टचे अध्यक्ष राजेश प्रजापती
- प्रकल्प सुरु करताना पर्यावरण पैलू लक्षात घ्या
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामुळे अनेक डोंगर सपाट करण्यात येत आहेत, कांदळवनांची कत्तल सुरू आहे आणि तीन नद्यांचे मार्ग वळवले जात आहेत. या पर्यावरण-विरोधी कामाला किती विकासकांनी विरोध दर्शवला असा प्रश्न खारघर येथील पर्यावरण कार्यकर्त्या ज्योती नाडकर्णी यांनी विचारला आहे. एखाद्या प्रकल्पावर काम सुरू करण्यापूर्वी सर्व पर्यावरण पैलू लक्षात घेतले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai