Breaking News
पनवेल ः सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षेबाबत दिलेल्या निर्देशानुसार पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वर्षभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1 हजार 678 वाहनचालकांचे परवाने निलंबित केले आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सरते वर्ष चांगलेच भोवले आहे.
देशात विविध ठिकाणांवर होणाऱ्या अपघातांमधील मृत तसेच जखमींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती स्थापन करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी वाहतूक विभागाकडून केली जात आहे. नवी मुंबई वाहतूक शाखेच्या पनवेल परिवहन हद्दीतही याच अनुषंगाने गेल्या वर्षभरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1 हजार 678 वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त मोबाईलचा वापर करून वाहन चालवणे (1,042), सिग्नल ओलांडणारे (387), मद्यप्राशन/अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवणे (16) विना हेल्मेट (46) आणि वेगमर्यादेचे उल्लंघन (43) वाहनचालकांचा समावेश आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai