Breaking News
उरण ः नवी मुंबई पालिकेची एनएमएमटी बससेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी उरणच्या जेष्ठ नागरीक व मॉर्निंग कट्टा ग्रुपने केली आहे. त्यासाठी उरण शहरात सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली असून त्याचा नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. फेब्रुवारी मध्ये खोपटे येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नवी मुंबईसाठी प्रवासाची जीवन रेखा ठरलेली एनएमएमटी बस सेवा व्यवस्थापनाने कामगारांची सुरक्षा आणि तोट्यात चालणारा मार्ग ठरवून अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. याचा फटका उरणच्या प्रवाशांना बसत आहे.
यामध्ये विशेषतः जेष्ठ नागरिक,महिला,विद्यार्थी व कामगार यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना आपलं निश्चित ठिकाण गाठण्यासाठी पुन्हा एकदा धोकादायक खाजगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागला आहे. परिणामी वेळ आणि अधिकच्या खर्चाची भार आता उरणकरांच्या खिशावर पडणार आहे. शुक्रवार रात्री पासून उरण ते नवी मुंबई दरम्यानच्या 30,31 आणि 34 या क्रमांकाच्या मार्गावरील एनएमएमटीची बस सेवा पूर्ण बंद करण्यात आली आहे. या व्यवस्थेला पर्याय म्हणून उरण ते बेलापूर/ नेरुळ मार्गावरील लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ लागली आहे. मात्र स्थानकातून एका तासांनी सुटणाऱ्या लोकल आहेत. त्यामुळे ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai