Breaking News
मुंबई ः शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शकले होवून प्रत्येकजण माझाच पक्ष खरा असे सांगत आहेत. न्यायालयाने निकाल दिला नसल्याने आपण आता जनतेच्या न्यायालयात दाद मागू असे उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी वारंवार सांगितले आहे. त्यामुळे 23 तारखेला होणाऱ्या मतगणनेत कोणाचे जास्त आमदार निवडून येतात यावरुन मुळ पक्ष कोणाचा हे निश्चित होणार असल्याने चारही पक्षाच्या नेत्यांमध्ये धडकी भरली आहे.
जुन 2022 मध्ये शिंदे यांनी 40 आमदार सोबत घेवून शिवसेना पक्षावर दावा ठोकला. शिंदे यांची मागणी रास्त ठरवत केंद्रिय निवडणुक आयोगाने शिवसेना नाव व चिन्ह शिंदे यांना बहाल केले. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्याबाबतची याचिका प्रलंबित आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करुन राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकला. केेंद्रिय निवडणुक आयोगाने मागील निर्णयाची री ओढत पक्षाचे नाव व चिन्ह अजित पवार यांना बहाल केले. शरद पवार यांनीही याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असून तीही याचिका प्रलंबित असल्याने शिवसेना व राष्ट्रवादी नक्की कोणाची हा निर्णय अद्यापपर्यंत लागला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी आपण जनतेच्या न्यायालयात जावून आपला हक्क्क सिद्ध करु अशी भुमिका घेतली होती.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे, शरद पवार व एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी 80 हून अधिक उमेदवार राज्यात उभे करुन जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न केला आहे. याउलट अजित पवार यांनी 59 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले हेोते. त्यामुळे वरील चारही पक्षांचे किती आमदार निवडून येतात याकडे आता पक्षनेत्यांसह कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.
जनतेच्या मनातील प्रश्न
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai