विमानतळाला ‘दि.बा.पाटील' नाव मिळण्यासाठी केंद्रात पाठपुरावा करणार
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 15, 2024
- 396
सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे एकमत
नवी मुंबई ः राज्य सरकारने दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजूरीसाठी पाठविला. मात्र दोन वर्षे झाले त्यावर कोणताही निर्णय केंद्र सरकारने दिला नाही. सहा महिन्यांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहिले विमान उड्डाण होणार आहे. तसेच रोजगाराबाबतही सिडकोने अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे. विमानतळाला ‘दि. बा. पाटील' यांचे नाव मिळावे यासाठीचा लढा पुन्हा आक्रमक करण्याचा विचार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
मागील दोन वर्षांपासून पनवेल व उरण येथील विविध राजकीय पक्ष, स्थानिक प्रकल्पग्रस्त या लढ्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. तरी केंद्र सरकारने या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर न केल्याने प्रकल्पग्रस्तांच्या मनात खदखद आहे. दि.बा.पाटील यांची 24 जूनला पुण्यतिथी आहे. राज्य सरकारने दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजूरीसाठी पाठविला. मात्र दोन वर्षे झाले त्यावर कोणताही निर्णय केंद्र सरकारने दिला नाही. त्यानंतर उलवे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार भव्य सभा झाली. त्या सभेत यावर कोणतेही भाष्य पंतप्रधान मोदी यांनी न केल्याने पनवेल व उरणचे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी व्यक्त केली. त्यानंतर लोकसभेच्या निवडणूकीसाठी खारघर येथील प्रचारसभेत 7 मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल असा विश्वास व्यक्त करुन पुन्हा स्थानिकांची साथ मिळविण्याचा प्रयत्न केला. यावर्ष अखेरीस या विमानतळाचा पहिला टप्पा मालवाहू विमानांचा सुरू होणार असल्याने अवघ्या सहा महिन्यांमध्ये या विमानतळाच्या नावावर केंद्राला सुद्धा निर्णय घेणे गरजेचे असणार आहे.
विमानतळाच्या नामकरणासोबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना या विमानतळामध्ये कोणत्या नोकऱ्या मिळणार याबाबत सिडको महामंडळाने अद्याप कोणतेही स्पष्ट भूमिका मांडली नसल्याने विमानतळाच्या नामकरणासोबत रोजगारासाठी या कृती समितीने पुढाकार घेण्याची मागणी स्थानिक सुशिक्षित भूमिपूत्रांकडून केली जात आहे. बुधवारी पनवेल येथे दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान, नागरी विमान वाहतूक केंद्रीय व राज्यमंत्र्यांकडे यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. या बैठकीत माजी खा. संजीव नाईक, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, जेष्ठ नेते जगन्नाथ पाटील, नवी मुंबईचे दशरथ भगत, शेकापचे जे.एम. म्हात्रे, दि. बा. पाटील यांचे पूत्र अतुल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक नितिन पाटील, जे.डी. तांडेल व इतर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai