Breaking News
सहा महिन्यांत खाद्यतेलांच्या किमतीत दुप्पट वाढ
नवी मुंबई : गेल्या सहा महिन्यात खाद्यतेलांच्या किमंतीत दुप्पटीने वाढ झाली आहे. 70 ते 80 टक्क्याने तेलांच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या वाढलेल्या किमतींचा सामना करणार्या सर्वसामान्य नागरिकांना आता खाद्यतेलाच्या फोडणीसाठी खिशाला कात्री लागत आहे. 90 रुपये किलोने मिळणारे तेल आता दुप्पट दराने विकत घ्यावे लागत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या तेलाच्या किमती, आयात करावर दोन्ही देशांनी लावलेले आयात-निर्यात शुल्क, परदेशात कमी झालेले उत्पन्न, कामगारांचे प्रश्न, कोरोनाचे संकट यामुळे सर्वाधिक आयात या विविध कारणांमुळे तेलाच्या किमती वाढल्या असून किरकोळ बाजारात या किमतीत 20 टक्क्याने आणखी वाढ होत आहे. त्यामुळे तेल 200 रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. पेट्रोल, डिझेलचे दर काही शहरात तर शंभर रुपये झाले आहेत. प्रत्येक अन्नपदार्थाच्या फोडणीसाठी स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक असलेल्या खाद्यतेलांच्या किमंतीतही दिवाळीनंतर कमालीची वाढ झाली आहे. 90 ते 100 रुपये किलोने मिळणारे खाद्यतेल आता थेट 150 ते 180 रुपये किलोने घाऊक बाजारात विकले जात आहे. (पान 7 वर)
व्यापार्यांच्या मते ही दरवाढ 70 ते 80 टक्के आहे. मागील शंभर वर्षांत इतक्या मोठया प्रमाणात कधीही दरवाढ झालेली नाही असे एपीएमसीमधील तेल व्यापार्यांनी सांगितले. भारतात 70 टक्के खाद्यतेल हे परदेशातून आयात केले जात असून केवळ 30 टक्के तेल देशातील वापरले जात आहे. त्यामुळे खाद्यतेलासाठी भारत हा मलेशिया, अर्जेटिना, युक्रेन, ब्राझील या देशांवर अवलंबून आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai