Breaking News
मुंबई : राज्यात 12 वीनंतर आता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यंदा दहावीचा निकाल 94.10 % लागला असून कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 98.82 टक्के असून नागपूर विभागात सर्वात कमी 90.78 टक्के निकाल लागला आहे. राज्यात एकूण 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले असून लातूरमधील 113 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवत देदीप्यमान कामगिरी बजावल्याचं दिसून येते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहारीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्क्केवारी 96.16 तर मुलांच्या 92.61 टक्के आहे. राज्यात 275 विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण मिळाले आहेत तर शंभर टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 211 असण्याची माहिती आहे. त्यापैकी 113 विद्याथ लातूर विभागाचे आहेत. राज्यात 4 लाख 88 हजार 745 विद्यार्थ्यांनी 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. निकालाची विभागनिहाय टक्केवारी
पुणे : 94.81 टक्के
नागपूर : 90.78 टक्के
संभाजीनगर : 92.82 टक्के
मुंबई : 95.84 टक्के
कोल्हापूर : 96.78 टक्के
अमरावती : 92.95 टक्के
नाशिक : 93.04 टक्के
लातूर : 92.77 टक्के
कोकण : 98.82 टक्के
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai