Breaking News
मुंबई ः कोरोनामुळे सर्वसामान्यांचं आरोग्य धोक्यात आलंच पण कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही विपरित परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. कोरोनामुळे एकट्या भारतात 29 कोटी विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात आलं असून त्यापैकी 13 कोटी मुली आहेत. युनेस्कोने जारी केलेल्या अहवालातून या धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. युनेस्कोच्या मते, भारतातल्या शाळा सोडणार्या मुलींपैकी निम्म्याहून अधिक मुली पुन्हा शाळेत येत नाहीत. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. यासोबतच कोरोनामुळे पूर्वप्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील 11 कोटींहून अधिक मुलं अद्याप शालेय शिक्षणापासून वंचित आहेत. शालेय शिक्षणापासून वंचित राहिलेल्या जगातल्या मुलांपैकी जवळपास 7.5 टक्के मुलं भारतात आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai