Breaking News
पनवेल : मार्च-एप्रिल महिना सुरु झाला वाढणाऱ्या उन्हासोबत पाणीटंचाईही वाढत जाते. त्यामुळे अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या योग्य पाणी नियोजनासाठी सालाबादाप्रमाणे यंदाही पनवलेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणारा आहे. आठवड्यातील एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेने मंगळवारी याबाबतची जाहीर सूचना प्रसिद्ध करुन कोणत्या जलकुंभावरील पाणी ग्राहकांना आठवड्यातील कोणत्या दिवशी पाणी मिळणार नाही याची सूचना प्रसिद्ध केली आहे.
पनवेल शहरातील रहिवाशांना 32 दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता आहे. देहरंग येथील अप्पासाहेब वेदक धरणातील शिल्लक पाण्याचा साठा संपूर्ण उपसा केला तर मे महिन्यापर्यंत जलाशयातील सर्व पाणी संपून जाईल. यासाठी महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) या संस्थांकडून पाताळगंगा नदीतील उसनवारीने पाणी घेऊन पनवेल शहरातील नागरिकांना पुरवठा केला जातो. रविवार आणि सोमवार पाताळगंगा नदीतून मिळणारा पाणी पुरवठा कमी होतो. तसेच इतरवेळी तांत्रिक दुरुस्तीच्या कारणामुळे पाणी पुरवठा अनियमित होत असल्याने देहरंग धरण आणि पाताळगंगा नदीतील पाणी साठ्याच्या नियोजनासाठी पनवेल शहरातील 9 वेगवेगळ्या जलकुंभनिहाय पाणीपुरवठा केला जात असल्याचे पनवेल पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता विलास चव्हाण यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मागील वष 29 डिसेंबरला पाण्याचे नियोजन करावे लागले होते. यंदा मार्चपासून पालिकेला नियोजन करावे लागले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai